Halloween Costume ideas 2015

श्री समर्थ मंडळ ( ट्रस्ट ), अहमदनगर संचालित...

February 2017

श्री समर्थ मंडळ (ट्रस्ट)

आपल्या ब्राम्हण समाजाची "श्री समर्थ मंडळ " ट्रस्ट या नावाची संस्था आहे. तिचे धर्मादाय आयुक्त नगर यांचेकडे नोंद केलेली आहे हे आपणास माहित आहे. आपल्या संस्थेची चितळे रोड, (डॉ.ताम्बेसमोर ) स्वमालकीची अंदाजे ५ हजार स्केअर फुट जागा आहे. संपूर्ण इमारत जुनी झाल्याने , धोकादायक झाल्याने पडली असून सध्या रिकामा प्लॉट झाला आहे.
आपली संस्था नगरमधील एक जुनी व  सुपरिचित अशी संस्था
आहे."सातभाई मोकाशी मंगल कार्यालय " या नावाने ती परिचित आहे. श्री.मोकाशी व श्री.सातभाई या नगरमधील थोर परिवारांनी मौंज, लग्न व इतर धार्मिक उपक्रमांसाठी हि जागा संस्थेस देणगी दिली आहे. त्यावेळच्या अन्य समाज बांधवांनी या स्तुस्त्य उपक्रमास यथाशक्ती हातभार लावून सहकार्य केले आहे. त्यामुळे १९६० साली हि
संस्था उभी राहू शकली आहे. या जागेत पूर्वी अनेक लग्न, मौंजी, श्रावणी, दासबोध पठण व इतर धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत. समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेने वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे. तसेच दासनवमी निमित्त समर्थ वाड्मयाचे समाजाकडून चिंतन व्हावे म्हणून पाठांतर, कथाकथन, सूर्यनमस्कार इ. स्पर्श आयोजित
करून विद्यार्थी अवस्थे पासून समर्थ विचार रुजवण्याचा संस्थेने यशस्वी प्रयत्न केला आहे. आपल्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींना आजही याचे स्मरण असेल.
आपल्या समाजाच्या वधूवर सूचक मंडळाचे कामकाज श्री. गोविंदराव क्षीरसागर (गायकवाड कॉलनी, सावेडी) हे विनामुल्य पाहत असून त्यांचा फोन नं.0241 २४२९७४५ आहे.दुपारी ४ ते ५ या वेळेत समाजबांधव
याचा लाभ घेऊ शकतात.

कै. . बाबुराव धर्माधिकारी, भगवानराव धर्माधिकारी, सिदू काका
धर्माधिकारी, डॉ.होशिंग, हरिभाऊ सोमाणी, डॉ.उदास, राजूरकर,
काकासाहेब चिंचोरकर, डॉ.यादवाडकर, केशवराव सारोळकर, मोकाशी, वस्ताद पिंगळे,बाळासाहेब सातभाई,यशवंतराव भालेराव, भालजीकाका पारखी, दंडवते,मा.श्री मामासाहेब हातवळणे,इ. जेष्ठ व्यक्ती आपल्या
संस्थेचे धडाडीचे पदाधिकारी होते, हि संस्थेच्या अभिमानाची गोष्ट आहे.

सध्याही नगरमधील व नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेल्या ब्राम्हण
समाजाला "श्री समर्थ मंडळ" या आपल्या संस्थेबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, व संस्थेला पूर्वीचे वैभवाचे व भरभराटीचे दिवस यावेत,हि तळमळ आहे. मध्यंतरी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन नवीन
कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे. नवीन कार्यकारिणीने अड्व्होकेट श्री अच्युतराव पिंगळे (अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला पूर्वीचे
वैभव प्राप्त करून द्यायचे असा दृढ निश्चय केला आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या आशीर्वादाने व सर्व समाजबांधवांच्या संपूर्ण सहकार्याने हा दृढ निश्चय पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
सध्या संस्थेचे कोर्ट कचेर्यांमधीलसर्व प्रकाराने मिटली आहेत. संस्थेच्या जागेत कुणीही भाडेकरी नाही व जागा पूर्णपणे मोकळी आहे. संस्थेचे
कोर्पोरेशांचे कर बरेच थकले होते. ( अंदाजे ५५ हजार रुपये) ते सर्व
संस्थेने एक राक्क्मेने भरले आहेत, त्यामुळे कुठलीही थकबाकी नाही. धर्मादाय आयुक्त (चैरिटी कमिशनर ) यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संस्थेने सर्व पूर्तता केलेली आहे व
करीत आहे.
मध्यंतरी समाजातील बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांची एक अनौपचारिक बैठक संस्थेने घेतली. त्यावेळीही सर्व मान्यवरांनी इमारत
बांधकामाबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे काबुल केले आहे. चितळे रोड
सारख्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेची स्व मालकीची जागा आहे. तिथे
'ऋग्वेद भवन' नावाची हि शानदार इमारत उभी करणे हे संस्थेचे ध्येय आहे. तळमजल्यावरील जागा बँकेस भाड्याने द्यावयाची आहे. पहिल्या मजल्यावर पूर्वीप्रमाणे सातभाई मोकाशी मंगल कार्यालय सुरु करून
लग्न, मौंज, इ धार्मिक कार्यक्रमांसाठी कार्यालय उपलब्ध करून द्यावयाचे
आहे. दुसऱ्या मजल्यावर श्री समर्थ रामदास स्वामींचे वाड्मय, धार्मिक पुस्तके, इ. ( लायब्ररी) तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या रामदास स्वामी भक्तांसाठी तसेच साधू संत, थोर व्याख्याते, विद्वान यांची निवास
व्यवस्था करावयाची आहे. तसेच दासनवमी, निरनिराळ्या
व्याख्यानमाला,प्रवचने, कीर्तने, दासबोध पारायण, श्रावणी,इ धार्मिक कार्यक्रम करावयाचे आहेत. भूमिपूजन सज्जनगड येथील समर्थभक्त
मोहनबुवा रामदासी यांच्या शुभहस्ते करण्याचा मानस आहे. तसेच मुंबई व नाशिक येथी समाजबांधवांना निमंत्रित करणार आहे.
वरील सर्व आराखडा ढोबळ मानाने ठरविला आहे. सभासदांना पूर्ण
विश्वासात घेऊन, वेळोवेळी विचार विनिमय करून, बांधकाम
व्यावसायिकांशी चर्चा करून व परिस्थितीनुरूप योग्य ते बदल केले
जातील हि समाज बांधवांनी खात्री ठेवावी.

आव्हान मोठे आहे, बजेट मोठे आहे ( अंदाजे ७० ते ८० लाख रुपये) मात्र श्री समर्थ रामदास स्वामींचे आपण अनुयायी आहोत. हे आव्हान आपण सहज पेलू असा विस्वास आहे. परंतु हे एकात्यादुकात्याचे काम नाही. सर्व समाज बांधवांचे योगदान अपेक्षित आहे. आपण सभासद नोंदणी व इमारत निधी हे दोन विषय प्रामुख्याने हाती घेतले आहेत. १००० रु. (
रुपये एक हजार फक्त ) भरून आपण आजीव सभासद होऊ शकता. तसच इमारत निधी यथाशक्ती आहे. आपण रोख पैसे देऊ शकता किंवा "श्री
समर्थ मंडळ ( ट्रस्ट), नगर" या नावाने क्रॉस चेक दुये शकता. याची
आपणास पावती दिली जाईल. आतापर्यंत शेकडो समाज बांधवांनी
आजीव सदसत्व स्वीकारले आहे. तसेच महिलांचा हि सहभाग आहे.


आसे अतीत अभ्यागत l जाऊ नेदी जो भुकिस्त l
यथानुशक्त्या दान देत l  तो सत्वगुण ll

वरीलप्रमाणे सविस्तर माहिती, आराखडा तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कराव्यात.
तुमचे सर्व प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे. क्रुपय तुम्ही आजीव सभासद व्हा, आपल्या समाज बांधवांना, नातेवाईकांना, मित्रांना, परिचितांना
माहिती द्या. व आजीव सभासद होण्यास प्रवृत्त करावे हि नम्र विनंती.




श्री समर्थ मंडळ (ट्रस्ट) 

ऋग्वेद भवन सातभाई मोकाशी मंगल कार्यालय 

चितळे रोड अहमदनगर .

इसवी सनाच्या 1960 च्या सुरवातीस अहमदनगर मधील ब्राम्हण मंडळी कधी नव्हे ती एकत्र आली आणि त्यांनी एकमताने (हे ही एक विशेष) ठरविले की एक ब्राम्हण मंडळ स्थापन करावे. त्यांच्या समोर आदर्श होता तो समर्थ रामदास स्वामींचा. त्यानुसार त्यांनी मंडळाचे नामकरण ‘श्री. समर्थ मंडळ ट्रस्ट’ असे निश्चित केले व त्यास सरकारकडुन अनुमती मिळविली.
संसार त्याग न करता । प्रपंच उपाधि न सांडिता ।
जनामध्ये सार्थकता । विचारेचि होय ।।
या समर्थ रामदास स्वामीच्या उक्तीने प्रेरीत होऊन आपला प्रपंच सांभाळुन सर्वांचे विचार एकत्र करुन कार्य करावे ते ही लोकापयोगी असावे अशा उद्देशाने सर्वानी दरमहा पाच रुपये भिशी सुरु केली. या भिशीचा आर्थिक लाभ कोणाला ही न मिळता फक्त श्री समर्थ मंडळाला होईल ही भावना होती. जमा रकमेतुन सार्वजनीक कार्यासाठी एक वास्तु उभी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहीले. परंतु जमा रक्कम व जमीनीची किंमत यांचे प्रमाण व्यस्तच राहिले. स्वप्न पुर्तीची आशा मावळती की काय? असा प्रश्न पडला. परंतु अशा प्रसंगी शहरातील दोन उदार धनिकांनी हा प्रश्न सोडवीला. त्यांनी प्रत्येकी ७५००/- रु देऊन चितळे रोड वरील सि.स.नं. 5806 ही जागा 15 हजार रुपये देऊन श्री समर्थ मंडळाचे नावे खरेदी करुन दिली. (5500 चौ. फुट) असे औदार्य दाखवणा-या धनिकांची नावे श्रीमान बाळासाहेब सातभाई व श्रीमान गोपळराव मोकाशी ही होत. जागा खरेदी झाल्यानंतर मंडळाने धनिकांना विनंती केली की, आपली रक्कम यथा शक्ती  व यथावकाश परत करु, परंतु या विनंतीला त्यांनी नम्रपणे नकार दिला व दिलेले दान परत घेणे योग्य नाही असे त्यांनी सांगीतले.
श्री समर्थ मंडळ ट्रस्टकडे आता स्वत:ची जागा होती. या जागेवर सार्वजनीक कार्यासाठी इमारत उभी करण्याचे ठरवीले. अहमदनगर मध्ये पाण्याची तीव्र टंचाई त्याकाळीही होती. जागेमध्ये एक विहिर खोदली सुदैवाने त्यास पाणी लागले. विहरीस जिवंत झरे असल्याने पाणी भरपुर प्रमाणात उपलब्ध झाले. एक दुमजली लाकडी इमारत मंडळाने उभी केली.
विहिरी बाबत सांगावयाचे म्हणजे बरीच वर्षे या विहिरीच्या पाण्याचा उपयोग झाला नाही. मात्र अलिकडच्या काळात नवीन इमारत बांधतांना या विहिरीच्या पाण्याचा बांधकामासाठी उपयोग झाला. आज ही विहिर व्यवस्थित बांधली व त्यावर झाकण बसविले आहे. सध्याच्या इमारतीचा पुर्णपणे वापर झाला तरी पाण्याची कमतरता भासणार नाही असा जलस्त्रोत मंडळाकडे आहे.
5500 चौ. फुट जागेत एक छोटेखानी इमारत बांधली त्याचा उपयोग मंगल कार्यालयासाठी करण्याच्या उद्देशाने त्याचे नाव "सातभाई मोकाशी मंगल कार्यालय" असे ठेवुन मंडळाने उदार धनिकाच्या ऋणात राहणे पसंत केले. या वास्तुत लग्न, मुंज, श्रावणी, दासबोध पारायण असे अनेकविध उपक्रम करता येऊ लागले यात लोकांचा सहभाग ही बाब महत्वाची.
काळाच्या ओघात शहरात अन्य ठिकाणी सोयीनी युक्त अशी मंगल कार्यालये (अथवा हॉल) उभी राहिली. या छोटेखानी वास्तु ती जुन्या पद्धतीची व लाकडी इमारतीकडे, मंगल कार्यालयाकडे लोक फारसे फिरकले नाही. लोकांना सातभाई मोकाशी मंगल कायालय अपुरे वाटु लागले.
साधारणपणे 1966-67 च्या सुमारास शहरातील काही मंडळांनी एकत्र येऊन शाळा सुरु करण्याचे ठरविले या मंडळीमुळे देखील समर्थ रामदास स्वमीचा आदर्श होता. त्यांनी "समर्थ शिक्षण संस्था" या नावाने संस्था सुरु केली. शाळेसाठी त्यांना इमारत नव्हती त्यांनी मंडळास सातभाई मोकाशी मंगल कार्यालयाची जागा शाळेसाठी देण्याची विनंती केली व श्री. समर्थ मंडळाने ती देऊ केली. बरीच वर्षे शिक्षण संस्थेने या वास्तुत शिक्षणकार्य केले. जुनी व लाकडी इमारत असल्याने ती जीर्ण झाली. दरम्यानच्या काळात शिक्षण संस्थेने स्वत:ची इमारत बांधली व इ.स. सन 2005 मध्ये श्री समर्थ मंडळाकडे वास्तु हस्तांतरीत झाली.
आता या जुन्या वास्तुच्या जागी नवी इमारत बांधणे क्रमप्राप्त होते. पुन: प्रश्न आला आर्थिक निधीचा. जुना इमारत पाडुन त्या ठिकाणी नविन इमारत बांधणे हे फार कष्टाचे व खर्चिक प्रकरण होते. समर्थ रामदास यांचे अनुयायी असल्याने ट्रस्टच्या सभासदांनी हाती "झोळी" घेतली व निधी जमविण्यास सुरुवात केली. झोळीमध्ये आलेले यथाशक्ती दान हे इमारतीचे काम सुरु करण्यास योग्य आहे असे वाटल्याने इ.स. 2009 मध्ये जुनी इमारत पाडुन नविन इमारतीचे बांधकाम करण्याचे ठरविले. या कामी संस्थेच्या सभासदानी विनामुल्य सेवा दिली या मध्ये श्री. संजय सोवनी यांनी आर्किटेक्टची भूमीका पार पाडली तर आर.सी.सी. व स्ट्रक्चरल डिझाईन ची जबाबदारी श्री. अविनाश कुलकर्णी यांनी सांभळली, श्री धोंगडे साहेब यांनी पालिकेच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले. श्री. सुरेद्र धर्माधिकारी यांनी इमारतीच्या बांधकामचे सुपरव्हिजन केले. आणखी चार व्यक्तींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. श्री रसाळ, श्री मकरंद कुलकर्णी, श्री. राजाभाऊ मुळे व श्री जयदीप कुलकर्णी यांच्या सुयोग्य अशांच्या मार्गदर्शनामुळे इमारतीचे बांधकाम रुळावर नव्हेतर सुरळीतपणे चालु राहिले.
या सर्वांनी आपला अमुल्य वेळ व प्रत्यक्ष सहभाग विनामुल्य दिला त्याबद्दल संस्था ऋणी आहे.
इस. 2014 मध्ये संस्थेच्या लगतचा सि.स.नं. 5810 हा 500 चौ. फुटचा भूखंड विक्रीस होता. संस्थेने तो विकत घेतला.
2009 ते 2015 या काल खंडात संस्थेचे बांधकाम उपलब्ध निधी नुसार चालु रहिले इमारतीचा मुख्य सांगाडा उभा राहिला. त्यातील तळ मजला व पहीला मजला ठीक ठाक करुन तळ मजल्यावरील सुमारे 2150 चौ. फुट जागा देना बँक या राष्ट्रीयकृत बँकेस भाडे तत्वावर दिली. किमान उत्पन्न सुरु व्हावे या उद्देशाने निर्णय घेण्यात आला. पहिल्या मजल्यावरील 3000 चौ. फुटाचा हॉल झाला त्याची तसेच बँकेचा भाग वगळता इतर जागेतील कामे निधी अभावी करता आली नाहीत. आपल्या संस्कृती व परंपरेनुसार दि. 15/02/2015 रोजी वास्तुशांती करण्यात आली व जागेचा वापर बँकेसाठी तसेच हॉलसाठी वापर (अर्धवट स्थितीत असुन) सुरु केला.
नविन सि.स.नं. 5810 व मुख्य इमारतीत बांधकामाच्या तसेच सोईच्या दृष्टीने काम अपूर्ण आहेत उदाहरणार्थ.
1. बेसमेंट मध्ये पेव्हर ब्लॉकचे काम
2. फॉल्स सिलींग, स्टेज, खुच्र्या, ध्वनीवर्धक तसेच एको प्रुफ सिस्टीम, उदवाहक (लिफ्ट) रंग रंगोटी
3. सुसज्ज पाकगृह
4. भोजन गृहासाठी वेगळी व्यवस्था
5. वाचनालय, अभ्यागतासाठी सुसज्ज निवासस्थान, टॉयलेट, सोलर वॉटर हिटर सिस्टिम इ.
या संपूर्ण कामसाठी निधी अपेक्षीत आहे. श्रावण महिन्यात घरोघरी वाचल्या जाणा-या कहाणीनुसार प्रपंचाची गरज भागवून खुलभर दूध देणा-या म्हतारीच्या दुधाने मंदीराचा गाभारा दुधाने पूर्ण भरला तव्दत सर्वानी आपला प्रपंच सांभाळुन खुलभर दूध म्हणजेच अल्पसा निधी या सार्वजनिक कार्यास दिला तर हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल यात शंका नाही.
संस्थेचे देना बँक अहमदनगर येथे खाते आहे त्याचा अकौंट नंबर 003110025170 असा आहे. बँकेचा IFSC कोड BKDN0510031 असा आहे. दान देतांना शक्यतो चेकने रक्कम द्यावी अन्यथा सरळ वरील अकौंटवर आपल्या बँके मार्फत चेक अथवा रोखीने भरली तरी चालेल. रोख रक्कम फक्त देना बँकेच्या शाखेत भरता येईल अन्य ठिकाणी चेकचा वापर करावा लागेल.

अच्युत सदाशिव पिंगळे 
अध्यक्ष - श्री समर्थ मंडळ ट्रस्ट 
अहमदनगर 
शब्दांकन - आर.डी. मुजुमदार 
सोबत -  नियोजीत इमारतीचे संकल्प चित्र.



१. जुन्या जीर्ण झालेल्या सातभाई मोकाशी मंगल कार्यालयाच्या जागेवर एक नवीन बहुउद्देशीय इमारत बांधण्याच्या उपक्रमाला मंडळाने प्राधान्य दिले. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. काही अंशी मंडळ यामध्ये दृश्य अशी कामगिरी करू शकले आहे.

२. या बहुउद्देशीय इमारतीचा उपयोग लग्न, मुंज, अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करण्याचा मंडळाचा मानस आहे. सध्याच्या घडीला श्रावणी, दासबोध पारायण, भजन, कीर्तन, अशा कार्यक्रमासाठी ऋग्वेद भवनाचा हॉल उपलब्ध आहे.

३. सदर इमारत ही लग्न, मुंज अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी (छोट्या सभा, समारंभ, वाढदिवस, नामकरण आदी) उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे.

४. सन २०१४ मध्ये मंडळाच्या लगत असलेला ५०० चौरस फुटांचा भूखंड मंडळाने विकत घेतलेला आहे.

५. सदर जागेत पूर्वी एक विहीर खोडलेली असून त्यास भरपूर पाणी आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही. सदर विहिरीचे पक्के बांधकाम करून त्यास वर जाळी बसवलेली आहे. मंडळाने सदर पाण्याचा वापर बांधकामासाठी केला.शिवाय शेजारच्या दोन इमारतींच्या बांधकामासाठीही त्याचा वापर झाला. त्यामुळे भविष्यातही पाण्याची टंचाई भासणार नाही.

६. वाचनालय-
मंडळाने या इमारतीत वाचनालयासाठी एक जागा निश्चित केलेली आहे. वाचनालयामध्ये वेद,उपनिषद, धर्मसिंधु, पुराणे, तसेच अन्य दुर्मिळ ग्रंथांसह कथा, कादंबर्या यासारखी पुस्तके, ठेवण्याचे प्रयोजन केले आहे. अशा पुस्तकांचा अभ्यासूंना लाभ घेता येईल.

७. गेल्या दोन वर्षापासून ‘आदर्श कुलोपाध्याय’ हा पुरस्कार मंडळातर्फे कै. सिद्धेश्वर शास्त्री – धर्माधिकारी यांच्या नावे दिला जातो. ही परंपरा पुढेही चालू राहील.

८. इमारतीस प्रशस्त असा जिना आहे. त्याचबरोबर उद्वाहक (लिफ्ट) उभारण्याचे काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल.

९. पहिल्या मजल्यावर ३ हजार चौरस फुटांचा प्रशस्त हॉल आहे. त्यात एक कायमस्वरूपी मंच व ८०० लोक बसतील अशी योजना आहे.

१०. दुसर्या मजल्यावर वधू- वर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. त्याशेजारी भोजनासाठी प्रशस्त जागा आहे.तसेच कार्यालयासाठी खोली आहे.

११. शेजारील एक जागा सपाट करून त्याठिकाणी बहुमजली इमारत बांधण्याचे प्रयोजन आहे. सदर इमारतीत तळमजल्यावर शौचालय, वरच्या मजल्यावर प्रशस्त किचन व वाचनालय तसेच दुसर्या मजल्यावर अभ्यागतांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे.

१२. गरम पाण्यासाठी पाण्याच्या टाक्यांसह सौरयंत्र बसविण्याचे प्रयोजन आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळ पालिकेकडून घेतला आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येईल.

१३. बेसमेंटमध्ये पार्किंगसाठी जागा आहे. त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येतील.

१४. मुख्य हॉल तसेच इतर ठिकाणी देव देवतांच्या तसेच सत्पुरुष यांची चित्रे असावीत. यासाठी द्नागीदारांनी अशी चित्रे देणगी स्वरुपात दिली तर स्वागतच आहे.

श्री समर्थ मंडळ (ट्रस्ट) 
ऋग्वेद भवन
 सातभाई मोकाशी मंगल कार्यालय
चितळे रोड अहमदनगर .

---------------------------------------

१. अड्व्होकेट श्री अच्युतराव पिंगळे (अध्यक्ष )
फोन- ०२४१ २३२४७६२  
मो. ९८६०७२३३८१ 

--------------------------------------------------------------

२. सचिन सुभाषचंद्र पारखी (सचिव)
 फोन-(०२४१)२३४०४८४
मो. ९८२२०७५९५१
ई-मेल- sachinparkhi72@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------


३. अनंत पांडुरंग होसिंग (खजिनदार)
 फोन- (०२४१) २४२६७५४,  ९४२३२००७१४

-----------------------------------------------------------------------------------


४. जयदीप भानुदास कुलकर्णी
फोन- (०२४१) २४२२४५९, मो. ९८२२०४९०९९

---------------------------------------------------------------------------------


५. महेंद्र अरविंद कुलकर्णी
फोन- (०२४१) २३२३०३०, मो. ९८२२३७००७४

---------------------------------------------------------------------------------


६. मिलिंद सदाशिव गंधे
फोन- (०२४१) २४२३३६७, मो. ९३२५१०३७८१

---------------------------------------------------------------------------------


७. मिलिंद उर्फ भैय्या सदाशिवराव गंधे
फोन- (०२४१) २४२२२३३, मो. ९४२२२२०४६०

---------------------------------------------------------------------------------


८. सुनील भगवान रामदासी
फोन- (०२४१) २३४५८०९, मो. ९८९०४५००६०

---------------------------------------------------------------------------------


९. नरेंद्र लक्ष्मण कुलकर्णी
फोन- (०२४१) २४२२४४२, मो. ९८५०२१७७७०

---------------------------------------------------------------------------------


१०. अच्युत दिगंबर कुलकर्णी
फोन- (०२४१) २४३०१२८, मो. ९३७००९२२०७

---------------------------------------------------------------------------------


११. अतुल वसंतराव सोमाणी
फोन- (०२४१) २४२८४००, मो. ९८२२०७२७५९

---------------------------------------------------------------------------------

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright 2012 - 2022 By ऋग्वेद भवन Designed By Kedar Bhope Mo.+91 8055373718. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget